लोक काय म्हणतील यावर लक्ष देवु नका
सर्व प्रथम स्वतःच्या ध्येया विषयीचे विचार स्पष्ट
करा.
एखादया माणसावर इतरांच्या विचाराचा परिणाम तोपर्यंत होत नाही,
भारत देशाच्या शोधार्थ निघालेल्या कोलंबसनं लोकांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं असतं, तर अमेरिकेचा शोध कधी लागला असता का असा अमेरिका देश ज्यानं आज सा-या जगाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे, जो कधी काळी लुप्त होता.
'हा लंबू फिल्म इंडस्ट्रीत हिरो कसा बनेल . असं म्हणून सुप्रसिध्द चिञपट अभिनेता अमिताभ बच्चन याला सतत हिणवलं जायचं. परंतु त्याने लोकांच्या टीकेकडे सतत दुर्लक्ष केलं आणि ठरवलेल्या उद्दिष्टाप्रत पोहचण्यासाठी जिवापाड मेहनत केली अन्यथा आज चिञपटस्रुष्टी एका महान कलाकाराला मुकली असती.
'व्यावसायीक गायकी हा काही पोरखेळ नव्हे' अशी अपमानास्पद टिप्पणी लता मंगेशकरांना कारकिर्दीच्या सुरवातीच्या काळात एेकावी लागली. परंतु त्यांनी लोकांचं म्हणणे फारसं मनावर घेतल नाही. म्हणुण तर आज संपुर्ण विश्व, गानकोकिळेच्या मधुर स्वरांचा स्वाद घेतोय.
'माणसानंही पक्ष्यांप्रमाणे उडायला हवं, ही शेखचिल्ली कल्पना आहे. केवळ पक्षीच उडू शकतात, माणसाला ते कदापि शक्य नाही' असं म्हणुन विमानाचा शोध लावणा-या राईटबंधूंना नाउमेद करण्याचा प्रयत्न कित्येक लोकांनी केला. परंतु लोकांच्या प्रतिक्रियेला न जुमानता त्यांनी आपलं संशोधन चालुच ठेवलं आणि अखेर विमानाचा शोध पूर्ण झाला.
सुधाचंद्रन या प्रसिध्द न्रुत्यांगनेबद्दल असं सांगितलं जातं, की अपघातामध्ये त्यांचा एक पाय तुटला. त्यांनंतर लोकांनी त्यांना कायमस्वरूपी न्रुत्य बंद करण्याचा सल्ला दिला. परंतु लांकांच्या सल्ल्याकडे काणाडोळा करून त्यांनी क्रुञिम पाय बसवून घेतला. अपार जिद्दीच्या, निरंतर अभ्यासाच्या जोरावर त्यांनी न्रुत्यकलेत अलौकीक यश संपादन केल. पाय असो वा नसो, या गोष्टीने न्रुत्य करण्यात कोणताही अडथळा येत नाही, हेच जणू त्यांनी जगाला दाखवून दिलं. अशाप्रकारे तुम्हीदेखील निर्भयतेची मशाल हाती घेवुन मार्गक्रमण करू शकता.
या सर्व उदाहरणांवरून प्रामुख्यानं एकच गोष्ट निदर्शनाला येते, ती म्हणजे या लोकांनी अपयशाचं भय बाळगून हाती घेतलेलं काम कधीही बंद केलं नाही. ते इतरांचा प्रेरणास्ञोत बनले. प्रतिकूल परिस्थितीत देखील भयग्रस्त विचारांवर मात करून, नकारात्मक विचारांना थारा न देता त्यांनी असामान्य यश प्राप्त केलं.
वरील उदाहरणांवरून 'एखाद्या माणसावर इतरांच्या विचारांचा परिणाम तोपर्यंत होत नाही, जोपर्यंत तो होउ देत नाही' या विचारनियमाची प्रचिती येते.
वरील सर्व उदाहरणांद्वारे एक गोष्ट स्पष्ट होते, की या लांकाच्या विचारात सदैव त्यांचं ध्येय असायचं. जे लोक आपल ध्येय वैचारिक रूपात स्पष्टपणे पाहू शकतात, ते कोणतेही बहाणे देत नाहीत. उलट सफलतेचं गीत गातात. अन्यथा माणूस आयुष्यभर रडगाणे गातो, 'मला तर कोणी प्रोजेक्ट दिलं नाही.... अद्याप मला खूप काही करायचं होतं...
तुम्हीच तुमच्या जीवनरूपी गाडीचे चालक आहात. म्हणून तुमच्या दिव्य योजनेवर विश्वास ठेवा. जसं, तुम्ही इतरांच्या दिव्य योजनेत बाधा आणू शकत नाही. तव्दतच अन्य कोणीही तुमच्या दिव्य योजनेमध्ये अडथळा निर्माण करू शकत नाही.