खालील दिलेल्या पाच कृती आचरणात आणा.
1. कृती भीतीला पळवते. तुमची भीती नेमकी जाणून घ्या आणि मग
सकारात्मक कृती करा.निष्क्रियतेनं भीतीला उलट बळ मिळतं आणि आत्मविश्वासाचा
ह्रास होतो.
2. तुमच्या स्मृतीकोषात (स्मरणपेढीत) फक्त सकारात्मकच
विचार टाकण्यासाठी जिवापाड प्रयत्न करा. नकारात्मक, स्व-अवमूल्यनात्मक
विचारांना मानसिक भुतं बनून तुम्हाला छळण्याची संधी देउ नका. अप्रिय घटना वा
प्रसंगांना तुमच्या आठवणीत थाराच देउ नका.
3. लोकांना योग्य परिमाणात बसवा. माणसा-माणसांमधील भिन्नतेपेक्षा
साम्यं अधिक आहेत, हे लक्षात ठेवा. समोरच्या व्यक्तीबद्दल समतोल विचार करा, तो
तुमच्या सारखाच एक माणुस आहे. आणि समजुतीची मानसिकता विकसित करा. भुंकणारे अनेक
असतात, चावणारा एखादाच.
4. तुमच्या सद्सद् विवेकबुध्दीला योग्य वाटेल तेच करा. अस
करण्यामुळे अपराधीपणाचा विषारी गंड निर्माण होत नाही. योग्य वर्तन, हा
यशस्वितेसंबंधीचा एक अगदी साधा नियम आहे.
5. तुमच्या वागण्या-बोलण्यातून आत्मविश्वास दरबळू द्या.
तुमच्या दैनंदिन
जीवनात खालील छोटया-छोटया तंञांचा प्रयोग करा.
1. नेहमी पुढच्या
रांगेत बसा.
2. दृष्टीला दृष्टी
भिडवण्याचा सराव करा.
3. तुमच्या चालण्याची
गती साधारणपणे 25 टक्क्यांनी वाढवा.
4. संभाषणात भाग
घेण्याचा सराव करा.