ध्येय कसे असावे..
1) सर्वात आधी कोणतेही एक ध्येय नक्की करा.
2) ते ध्येय साध्य करण्याची एक काल मर्यादा नक्की करा.
3) आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वतःला प्रत्येक क्षणी सज्ज ठेवा, अगदी एखाद्या सैनिकासारखे.
4) मनात नेहमी सकारात्मक विचारांनाच जागा द्या. नकारात्मक आणि निरूस्ताही करणा-या विचारांना आपल्या हाताला एखादी वाईट गाेष्ट लागल्यावर ज्या प्रकारे आपण ती लगेच झटकून टाकतो तसे झटकुन टाका.
5) आपला दृष्टिकोन नेहमी आशावादी ठेवा. निराशेचे भाव, विचार आणि भावनांना चुकुनही आपल्या मनात प्रवेश करू देऊ नका.
6) विचारपूर्वक आणि नव नवीन माहिती एकञ करून नव नवीन तंञाचा वापर करा.
7) पुस्तके, व्हिडिओ, रेडिओ, व्रुत्तपञ, नियतकालिके, इंटरनेट आणि टीव्हीसारख्या माध्यमांचा वापर करून आपले शिक्षण आणि ज्ञान सतत वाढवित रहा. ज्ञानी जनांनी असे म्हटले आहे, की एखाद्या तुच्छ व्यक्तीकडून जरी ज्ञान मिळाले तरी ते ग्रहण करायला विसरू नका. आणि त्यासाठी स्वतःला कमी समजू नका. अज्ञानी व्यक्तीसाठी ज्ञानाचे भलेही काही महत्व नसले तरी तेच ज्ञान तुम्हाला तुमच्या जीवनात पावलो पावली महत्वाचे ठरू शकते.
8) बहाणे सांगणे आणि टाळाटाळ करणे यासारख्या सवयी म्हणजे तुमचे कटटर शञू असून ते तुम्हाला नेहमी मागे ढकलीत असतात. लक्षात ठेवा, कोणतेही काम त्याच ठिकाणी संपत असते. जिथून ते सुरू करण्यात आलेले असते. काम पुर्ण झाल्यावर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सफलता मिळायला सुरुवात होत असते. या सफलतेच्या मार्गावर सतत पुढेच जायचे असेल, तर बाहणे सांगणे आणि टाळाटाळ करणे या सवयींचा त्याग करावाच लागेल.
9) या प्रकरणातील हे सूञ सर्वात महत्वाचे आहे. याच्याकडे विशेष लक्ष असू द्या. कधीही दुस-या कोणाच्या मदतीची वाट पाहत थांबू नका, कोणतेही कार्य आपल्या स्वतःच्या बळावर सुरू करा आणि संपवा.
10) कोणतेही कर्मयुध्द आपल्या बळावर लढा. लक्षात ठेवा, तुम्ही एक शिपाई आहात अाणि तुम्हाला तुमचे युध्द तुमच्या एकटयाच्या बळावर लढून त्यात विजय मिळवायचा आहे.
मिञहो, वर सांगितलेल्या गोष्टी तुम्ही स्वीकारल्या, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ इतकाच आहे, की, वरील गोष्टीचा तुम्ही आपल्या सवयी म्हणून स्वीकारल्या, तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला सफलता मिळविण्यापासून रोखू शकत नाही.